This story is Fantasy type story. In this story indirectly a message is given that we should protect our earth and enviornment of earth. We must love Nature and natural things and animals, human beings. Love gives energy to live happily. सहस्त्रपंखी नाव होतं तिचं! तिची काया स्फटिकजलासारखी नितळ होती. तिचा वर्ण लाल-गुलाबी होता. याशिवाय…
ही धरा म्हणाली काही अन अंबर हसले गाली सावळ्या मृत्तिकेवरती रोमांच जणू या साळी मज कळले नाही तेव्हा तुजलाही कळले नाही विश्वाची हिरवी भाषा बघ मळवट भरते भाळी
हंस तू राजसी पण मला टाळिशी बोलणे ते तुझे गुंजते मानसी त्या जुन्या स्मृतित मी बहरते मस्तशी कामसू जग जरी मीच का आळशी डाव ना संपला हार का मानशी घे मला प्राशुनी घाव का मोजिशी वृत्त- गा ल गा, गा ल गा.
भिजून चिंब चिंब मी तरी नसे तुडुंब मी विशाल शून्य तू जरी निवांत एक टिंब मी झळाळशील बघ अता तुझेच शांत बिंब मी करेन शुद्ध ही हवा कडू वनात निंब मी जपेन गारवा इथे नव्हेच आग, बंब मी नकोच आडवे पडू कधी कधीच लंब मी वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.
तू सांडतेस काही मग चाळतेस काही बोलायचे तसे ना पण बोलतेस काही श्वासातुनी मुक्याने मज सांगतेस काही जवळी असून सारे बघ शोधतेस काही जमवून चांदण्यांना ना माळतेस काही हा क्रम आणि मात्रा का गाळतेस काही ओझे न ही ‘सुनेत्रा’ तरि वाहतेस काही वृत्त- गा गा ल गा, ल गा गा.
नको अवेळी चहा सख्या वेळ जरा तू पहा सख्या नाते अपुले नको असे तीनावर जणु सहा सख्या या जगण्याची लज्जत घे वाफ होउनी वहा सख्या मी प्याला की नीर मधुर माझ्यातच तू रहा सख्या वाळ्याचे मी सरबत रे गंधामध्ये नहा सख्या