Tag: Marathi Kavita

  • नाजुक चण – NAAJUK CHAN

    नाजुक चण .. कणखर मन … फिकुटल्या गुलाबी पाकळ्यात … लपेटून तन …. मन लुटतय … निसर्गाचं धन… डेझी डेलिया ..चमेली चाफा … रंगबिरंगी … फुलांचा वाफा … अवतरला भुईवर … जादुई ताफा …

  • कलश – KALASH

    भाव शुद्ध अर्पिते प्रभूला प्रभूसम होण्या ओंजळ भरली शुभ्र फुलांनी अर्घ्य वाहण्या जाई जुई प्राजक्त मोगरा विपिनी फुलला सळसळणाऱ्या नवपर्णांनी पिंपळ सजला निसर्गातले रंग उधळण्या वसंत आला आभाळातून कलश घनांचा झरू लागला सृष्टीमातेच्या चरणी मम माथा झुकला

  • आसू आणि पाऊस – AASU ANI PAAUS

    पाऊस पावसाळ्यात पडून जातो… पावसाचा ऋतू असतो… तेव्हाच पाऊस पडून जातो.. जमिनीत मुरतो..शेतात पडतो… रानावनात कोसळतो… कधी माती वाहून नेतो… कधी विहिरीतले मृत झरे जिवंत करतो… घरांवर छप्पर फाडून कोसळतो… कधी कधी मग नद्यांना पूर येतो… काठावरची गावे जलमय होतात… धरणे जोहड भरून जातात.. कधी कधी पावसाचा ऋतू पण कोरडाच जातो.. पाऊस पडतच नाही… शेतकऱ्याच्या…

  • सांज गोरीमोरी – SAANJ GOREE MOREE

    किती ऊन सोने सांडते उन्हाळी काया घाम गाळे वेचून वेचून उन्हाचे चांदणे उन्हाचा पाऊस पेरण्या अक्षरे लेखणी झरेल ऊन सावलीत सावली उन्हात सावली रापते गव्हाळते ऊन झाकोळता नभ ऊन काळवंडे गर्द कडुनिंब त्याला वारा घाले गोधन गोठ्यात वाहने सुसाट उंबऱ्यात बाळ पाहतेय वाट ऊन काळगेले सांज गोरीमोरी धुळीत खेळून उभी शांत दारी संधिकाली तूप साजुक…

  • क्रोकरी – KROKAREE ( CROCKERY )

    एक ओळ मज सुचते जेंव्हा लिहावयाला काही भातुकलीतिल पितळी भांडी का घासू मी बाई टाळेबंदीच्या डावातिल डाव पळ्या अन काटे घासायाला भांडेवाली नकोच म्हणते वाटे मीठ चिंच वा लिंबू फोडी नको घालवू वाया पितांबरीने लख्ख उजळते तांबे पितळी काया किणकिणणारी सान क्रोकरी चहा म्हणूनी पाणी तरंग उठता हलके हलके अधरी बडबडगाणी

  • वेळ – VEL

    ही न वेळ असे खरी वाट पाहण्याची…. हीच वेळ असे खरी भेटाया जाण्याची… गप्पांच्या मैफलीत रंग नवे भरण्याला … हृदय उघड उघड मना काव्य नित्य झरण्याला …. बोल फक्त बोल गात गुणगुणता काही… अंतरंग सांगतेय गुज मला बाई….

  • वाह व्वा – VAAH VVA

    वाह व्वा वाह.. व्वा … या मुलींना सा.. र… काही कळत कळत …नकळत जुळत जातं … नकळत जुळत जुळत मळत पण जातं … म्हणून सांगते मुलींनो …आणि मुलग्यांनो , फार मळू … देऊ नका… वळायचं तेवढं वळून घ्या… कारण नंतर किती रडा …किती जोडा … उपयोग नाही होणार… ज्याच्या त्याच्या कर्मांचा हिशेब… चुकता मात्र करावाच…