-
साद दे रे – SAD DERE(CALL ME )
कशी काय बोलू मला बोलवेना कसा भार साहू अता साहवेना हृदय वाहते हे तुझ्या आठवांनी मनाला तरीही झुला बांधवेना असे वाटते सर्व सोडून यावे कुठे यायचे पण मनाला कळेना करू काय माझ्या-तुझ्या पाकळ्यांचे किती हार गुंफू गळा घालवेना खुशाली तुझी फक्त सांगेल कोणी जळो तूप सारे दिवा मालवेना सुनेत्रा सुनेत्रा अशी साद दे रे तुझे…
-
रिक्त रिक्त रात्र – RIKT RIKT RATRA(EMPTY NIGHT)
नेत्रात धुंद प्रीत पण रिक्त रिक्त रात्र अधरात मुग्ध गीत पण रिक्त रिक्त रात्र नयनात सांजवात घन सावळे उरात मल्हार आळवीत पण रिक्त रिक्त रात्र आहे अता सुरात माझा-तुझा प्रवास अंधार पाकळीत पण रिक्त रिक्त रात्र काट्यास मी जपेन पुष्पास सांग तूच रंगास पाखडीत पण रिक्त रिक्त रात्र बघ वर्षतात मेघ अन नाचतात मोर भिजते…
-
ओंजळ – ONJAL(CUPED PALMS)
ओंजळ -ललित… पूर्वप्रसिद्धी-तृप्तीची तीर्थोदके डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे गौरवग्रंथ, एप्रिल २००८ ‘दादांविषयी गौरवग्रंथ काढायचा आहे. त्यासाठी तुझा लेख हवा आहे ‘ असा माझा भाऊ डॉ. महावीर याचा एका सकाळी सकाळीच फोन आला. “किती दिवसात तयार होईल?” त्याने विचारले आणि वाटले, की दादांविषयी लिहायचे म्हणजे नेमके काय लिहायचे?किती लिहायचे? नेमकी कोठून सुरुवात करायची? त्यांच्या विषयीच्या माझ्या भावना,…
-
ऋतू सुखाचे – RUTU SUKHACHE(HAPPY SEASONS)
ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता पडेल पाऊस वेळेवरती धान्याने मग भरतिल पोती फळ फळावळ भाजीपाला गाई गुरांना चारा ओला कमी न काही पडेल आता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता रानामध्ये झरे वाहतिल झाडांवरती घरटी झुलतिल फूलपाखरे आणिक भुंगे हवेत उडतिल संगे संगे माणूस आता होईल दाता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे…
-
काय काय भाऊ? – KAY KAY BHAU?(WHAT IS GOING ON BROTHER)
This poem is written for children. This song is known as bal-kavya. अंगणात दंगा करतंय कोण? कोण कुणाला करतंय फोन? ही तर आपली गुबरी माऊ, ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ? येना अंगणात करायला दंगा, वाऱ्यासंगे घालायला पिंगा! ससोबा येताच चिमण्या आल्या मैना आली पोपट आणि बदक आले अंगणात चालला पाखरांचा दंगा .. किलबिल कलकल चिवचिव…
