-
अभ्यंतर – ABHYANTAR
टिपत राहणे काव्य निरंतर हाच जादुई जंतर मंतर माझ्यासाठी मम अभिव्यक्ती हाच जादुई जंतर मंतर अभ्यंतर काबूत असावे हाच जादुई जंतर मंतर अंतर अपुले सतत चाळणे हाच जादुई जंतर मंतर अंतर पाहुन वेग ठरविणे हाच जादुई जंतर मंतर स्त्री पुरुष दो माणूस जाती हाच जादुई जंतर मंतर देव नारकी गती जाणणे हाच जादुई जंतर मंतर…
-
प्रवासी पक्षी – PRAVAASEE PAKSHEE
जीव प्रवासी पक्षी आहे क्षितिजावरची नक्षी आहे वाघ कसा रे शाकाहारी तो तर प्राणीभक्षी आहे मोजत बसणारा योनींना गरगर फिरतो अक्षी आहे मुक्ती कशाची मोहांधाला बसून अपुल्या कक्षी आहे सुनेत्रास या कधीच कळले रत्नत्रय धन वक्षी आहे मात्रावृत्त (१६ मात्रा)
-
वारा चंचल – VAARAA CHANCHAL
शिशिराच्या पाचोळ्यातिल मज अक्षर अक्षर हाक मारते निरोप घेण्या वाज वाजते वसंत वाऱ्यावरती झुलते पीत पोपटी मृदु पर्णांकुर पाहुन सृष्टी हात जोडते किरण कोवळे चराचरावर मोद सांडता हृदय डोलते … पानांच्या जाळीतुन उतरे ऊन खोडकर हळदी तरुतळ मृदा तळीची उडत राहते वारा चंचल ऊन न चंचल गतकाळाच्या आठवणीतिल पिसे लहरती वाऱ्यावरती संधिकाल की उषाकाल हा…
-
खाडाखोडी – KHAADAA KHODEE
ठेव जपूनी मधुघट भरलेले तव अधरी अधरामधल्या बोलांनी भर हृदय घागरी मौनामधल्या भावभावना उसळुन येता अलबत येते गाजत भरती शुद्ध अंतरी गलबत येता मालाने गजबजते बंदर निवडक मालालाच त्यातल्या ठेव आगरी हस्तलिखीते मुद्रण प्रती भर मोजुनीया खतावणीतिल हिशेब दिसण्या खुल्या अंबरी खाडाखोडीवरती सुद्धा लिही खरे रे वळिवाची सर भिजविल पाने तुझी वासरी मात्रावृत्त (२४ मात्रा)
-
उदकाडी – UD KAADEE
प्राक्तन माझे गुलाम बनले मम आत्म्याच्या चरणी झुकले शून्य जाहल्या पंचभुतांना भविष्य माझे पुरून उरले उधाणलेल्या समुद्रात मन नाजुक उदकाडीवर तरले झरलेले मम अक्षर अक्षर शुभ्र कर्पुरासमान जळले लेखणीस मम वंदन करण्या कर जोडुन मी डोळे मिटले
-
सम्यक श्रद्धा -SAMYAK SHRADDHA
सम्यक श्रद्धेवर मी जगते सृष्टी माझी जिवंत आहे जगावयाची जगवायाची माझी भाषा ज्वलंत आहे म्हणोत कोणी काही मजला लिहीत राहिन सुरेल गाणी गाण्यांमधल्या बकुळ फुलांचा परिमल कीर्ती दिगंत आहे उंच कड्याच्या टोकावरुनी निळ्या नभाला बांधिन झूला सभोवताली पहावयाला मला कुठे रे उसंत आहे दोन पावलांपुरती भूमी बघून रोवे पाय अता मी पंख पसरुनी झेप घ्यावया…
-
हृदयाचा हिय्या – HRUDAYAACHAA HIYYAA
हृदयाचा हिय्या एक विशुद्ध भावकाव्य ….. कवी ग्रेस यांच्या बहुतांश कविता विशुद्ध भावकविताच आहेत. याबाबत म्हणजे विशुद्ध भाव काव्याबाबत कवी ग्रेस स्वतःच असे म्हणतातकी, “विशुद्ध कवितेचा मार्गच तर्काला तिलांजली देऊन तर्काच्या पलीकडून खुणावणाऱ्या नक्षत्र वाटांचा मागोवा घेत असतो. विशुद्ध भावकवितेतील तार्किक सुसंगती लय तत्वाच्या आधारे साधली जात असते. ती जीवशास्त्राच्या सेंद्रिय घटकांप्रमाणे विकसित होत असते,…