-
कविता रडली – KAVITAA RADALEE
माझ्यामध्ये गझल उमटली तुझ्यामुळे पण कविता रडली रडता रडता हसू लागली टपोर मोती उधळत खुलली फुलली गळली पुन्हा प्रकटली मुग्ध कळ्यानसम लाज लाजली लाजेचीही लाज वाटता ठिणगीसम ती फुलू लागली पाऊस पाडून मग ठिणग्यांचा लज्जेला ती जाळत गेली निर्लज्जांसम निडर बनली वीज होऊनी गगनी गेली मेघांना ती चोपून आली झरझर धारा वर्षत असता त्यांच्यासंगे नाच…
-
जलद तोटी – JALAD TOTEE
कश्शाला पाऊस पडेल सांगा कशाला पाऊस पडेल बाई हृदय भरून येतच न्हाई वाऱ्याची झुळूक चुंबत नाही सच्छिद्र देह झरत नाही डोळ्यात आसवे भरत नाही पापण दले हलत नाही पाऊस थेंब पडत नाही लिहीग सई काहीबाही लिहित रहा मंगल गाणी दवाच्या बिंदूंचे साठव पाणी मिसळ त्यात गारांचे पाणी बुडव तयात मातीचे हात सारव तयांनी अंगण गात…
-
मल्हार राग गाऊ – MALHHAAR RAAG GAAOO
डोळ्यात साठलेला घनगर्द भाव पाहू मेघात दाटलेला मल्हार राग गाऊ उडवीत मृत्तिकेला वाहील मस्त वारा जलदातुनी सुखाच्या वर्षोत प्रेमधारा नाचोत पंचभूते देहात कोंडलेली तुटूदेच साखळीही हृदयास काचणारी हातात हात घ्यावा तू नाचऱ्या विजेचा कर श्वास मोकळा तू मौनातल्या धरेचा ही वीण घट्ट मी ची उसवेन मी स्वतःही आभाळ बरसता हे बरसेन मी स्वतःही
-
सा रे ग म प ध नी सा – SAA RE GA MA PA DHA NEE SAA
-
बोला आता खरे खरे – BOLAA AATAA KHARE KHARE
मुदत संपली लपवायाची बोला आता खरे खरे सांगुन सांगुन दमलो चिडलो सत्यच सांगा खरे खरे कशास केली लपवाछपवी भले कुणाचे करावया अता न कुठली वाट तुम्हाला इकडे तिकडे पळावया चारित्र्याचा मिरवित तोरा फिरला तुम्ही इथे तिथे चारित्र्याची ‘असली’ व्याख्या तुम्हा कळाली कधी कुठे भ्रमात भिजवुन बुद्धी अपुली काय जाहले जीवाचे अहंकार अन हवस मनाची लाड…
-
सोक्ष मोक्ष – SOKSH MOKSH
फक्त फुलंच बनलो तर फुलायचं पूर्ण! उमलून यायचं पाकळी पाकळीनं … फूल रंगीत पाकळ्यांचं, फेनधवल पाकळीचं किंवा सुंदर पाकळ्यांचं! सुगंध उधळणारं मोहक फूल! कोणतही फूल आनंदी फूल… कधी देवाच्या पूजेत रमायचं कधी बुकेत तर कधी गजऱ्यात दाटीवाटीने बसून खिदळायचं हसायचं ! कधी झाडावरच डुलत रहायचं मजेत गाणी गात… वाऱ्यानं कधी केसर शिम्पताच जमिनीवर पडायचं परत…
-
तहान – TAHAAN
मूळ झालो काय किंवा डहाळी झालो काय काम तर करावंच लागणार ज्याला त्याला ज्याचं त्याचं ! मूळ झालात तर घ्या मातीत गाडून पाणी शोधायला पसरा हात पाय बोटे तहान कोण्या कैक जन्मांची असतेचना प्रत्येकाला ! म्हणूनच मुळाला करावं लागतं पाणी प्यायचे काम… त्याची तहान भागलीकी मग जमीन उघडते द्वार अंकुर येतो त्यातून वर खोड होण्यासाठी!…